संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलेले आहे . राज्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे जात असताना एका युवकाने ओबीसीतून आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील तेलगाव परिसरातील राजेश कानोडे या 22 वर्षीय युवकाने ओबीसीतून आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. मृत्युपूर्व एक चिठ्ठी लिहून त्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे.